कविता : दुःखाचे कारण तृष्णा
दुःखाचे कारण तृष्णा जेव्हा उमगले होते
मार्ग सत्याचा आनू सरावा बुद्ध वदले होते ||धृ||
अती धनाचा मोह नसावा
गरजे पुरता संच असावा
आधिकच्या मागे जिवन पळते समजले जेव्हा होते ||१||
आर्य सत्य समजून घ्यावे
दहा पारमीता आनू सरावे
पंच शिलांचे पालन करूनी सुखी जीवन होते ||२||
अंधश्रद्धा मुळी नसावी
रूढी परंपरा त्यागूनी द्यावी
मानवतावादी धम्म नरेशा जानले जेव्हा होते ||३||
- कवि नरेश गंगाराम जाधव (भिवंडी)
मो. 7517389746




0 Comments: