पत्रकारांनी वाचनातून शब्दसंपदा वाढवण्याची गरज ------दुर्गेश सोनार

पत्रकारांनी वाचनातून शब्दसंपदा वाढवण्याची गरज ------दुर्गेश सोनार

 पत्रकारांनी वाचनातून शब्दसंपदा वाढवण्याची गरज ------दुर्गेश सोनार 



कल्याण ( प्रतिनिधी) पत्रकार नेहमी शब्दांच्या दुनियेत  वावरत असतात लेखनात नेहमी निरनिराळ्या शब्दांचा वापर केला जातो. हे शब्द कसे वापरतो ,कोणते वापरतो यावर त्या पत्रकाराच्या लेखनाचा ,तसेच वृत्तपत्राच्या  साहित्याचा दर्जा अवलंबून असतो. आकाशवाणी ,दूरदर्शनखाजगी वाहिन्या यामुळे मराठीला खूप चांगले दिवस आले आहेत. आज प्रसार  माध्यमे बदलली पण शब्दांचे स्वरूप तेच राहिले. त्यामुळे शब्द वापरताना आपण समाजभान राखतो का?  याचे पत्रकारांनी आत्मचिंतन केले पाहिजे असा सल्ला देत पत्रकारांच्या हक्काच्या घरासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष घालून  म्हाडा असो व अन्य कोट्यातून        वाजवी दरात पत्रकारांना घर मिळण्यासाठी प्रयत्न करावे  असे दै. लोकमतचे सहाय संपादक दुर्गेश सोनार यांनी पत्रकार दिनी सांगितले. 

पत्रकार दिनाचे औचित्य साधून कल्याण प्रेस क्लब तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होतेकल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला प्रेस क्लबचे अध्यक्ष  आनंद मोरे अध्यक्षस्थानी  होते. चिटणीस विष्णुकुमार चौधरीज्येष्ठ पत्रकार विनायक बेटावदकरनवीन भानुशालीरमेश दुधाळकरयांची उपस्थिती होती.महापालिकेच्या जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे यांच्यासह डोंबिवली पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर जाधव,कल्याण पूर्वेचे आनंद गायकवाड टिटवाळ्याचे राजू टपाल ,कलीम शेख ,महादेव पंजाबी ,राजेश जाधव ,अरविंद म्हात्रे ,प्रशांत माने ,केतन बेटावदकर ,रवींद्र खरात ,संतोष होळकर ,भाग्यश्री प्रधान ,राजलक्ष्मी पुजारे ,अतुल फडके ,अशोक वर्मा ,प्रदीप गुप्ता ,हृषिकेश चौधरी ,आदीसह अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

    सत्य काय आहे हे दाखवणे पत्रकाराचे प्रथम कर्तव्य आहे. प्रत्येकाचा समाजातील चेहरा वेगळा असतो. घरातील चेहरा वेगळा असतो. पत्रकारांनी वाचन वाढवले पाहिजे .त्यापासून त्यांची शब्द संपदा वाढते.शब्दात अफाट ताकद असते. त्या ताकदीच्या जोरावर त्यांनी समाज परिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्याची  आज आवश्यकता आहे असे दुर्गेश सोनार यांनी सांगितले. पत्रकारांचे स्वताचे हक्काचे घर असणे महत्वाचे आहे. त्यासाठी मी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना तसे लेखी निवेदन दिले त्यावर पाठपुरावा करून मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांच्या कडे पुढील कार्यवाहीसाठी आदेश दिले आहेत याबाबत माझा  सतत पापुरावा  सुरु असून माझ्या कारकिर्दीत महापालिका  क्षेत्रात पत्रकाराना स्वतःचे हक्काचे घर मिळवून देणार असल्याची ग्वाही आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली  पत्रकारांना अनेक अडचणीतून जावे लागते. त्यामानाने त्यांना कामाचा मोबदला मिळत नाही. शासनाने दिलेल्या सवलती पत्रकारापर्यंत पोहोचत नाहीत त्यासाठी पत्रकारांनी एक होऊन संघटितपणे  काम करण्याची  आवश्यकता असल्याचे सांगितले.

0 Comments: