🌺 🌺 मकर संक्रांत का साजरी करतात?
जाणून घेऊया या मागील धार्मिक व वैज्ञानिक कारण !. 🌺 ज्योतिषप्राज्ञ् - नितीन परब 🌺
.
सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिषात संक्रांत म्हंटले जाते. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो. एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांती पर्यंतचा काळ हा सौर मास (महिना) म्हणून ओळखला जातो. पौष महिन्यात सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो ही गोष्ट देशभर वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रकारे उत्सव म्हणून साजरी केली जाते. मकर संक्रांती हा सण उत्तर भारतात दरवर्षी १४ जानेवारीला साजरा केला जातो.
.
🌺 मकर संक्रांतीला उघडते स्वर्गाचे द्वार असे का मानतात ?
.
असे मानले जाते की, संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते. त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो. यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते. म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य व दान हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक फलदायी असते. या साठी महाभारतातील एक पौराणिक कथा आहे.
.
🌺 महाभारतातील भीष्म पितामह यांनी या दिवसाची निवड केली
.
मकर संक्रांतीच्या दिवशी शुध्द तूप आणि शाल याचे दान केल्यास मोक्षप्राप्ती होते. महाभारत काळात भीष्म पितामह यांनी देहत्याग करण्यासाठी मकर संक्रांतीचा दिवस निवडला होता. गीतेत सांगितले आहे की, जो माणूस उत्तरायणात शुक्ल पक्षात देहत्याग करतो त्याला मुक्ती मिळते. मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण होतात म्हणून हा दिवस लोकं आनंद- उत्साहात साजरा करतात. तूप हे सिघन पदार्थ शाल पांघरू घेतल्याने थंडी पासून रक्षण होते
.
🌺 आणखी एक पुराणातील मकर संक्रांतीची कथा.
.
श्रीमद्भगवत तसेच देवी पुराणानुसार शनी महाराजाचे त्यांच्याच वडिलांशी वैर होते. कारण सूर्य देवाने त्याची आई छायाला त्याच्या दुसऱ्या बायकोचा संज्ञाचा मुलगा यमराजाशी भेदभाव करताना पहिले होते. या गोष्टीने नाराज होऊन सूर्य देवाने संज्ञा आणि त्यांचा मुलगा शनी याला स्वतःपासून वेगळे केले होते. म्हणून शनी व छाया यांनी सूर्य देवाला कुष्ठरोग्याचा शाप दिला होता.
.
🌺 मकर संक्रांतीशी जोडलेले आहे सूर्य व शनीचे वरदान
.
यमराज आपल्या वडिलांना सूर्यदेवाला कुष्ठरोगाने पछाडलेले बघून दुःखी झाले. यमराजने वडिलांना कुष्ठरोगापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी कठोर तपस्या केली. परंतु सूर्याने रागात येऊन शनी महाराजाच्या घरी असलेली कुंभ राशी जिला शनी देवाची राशी मानले जाते ती जाळून टाकली. त्यामुळे शनी व त्याची आई छाया हिला हाल-अपेष्टा सहन करावी लागली. यमराजने आपली सावत्र आई आणि भाऊ शनी ला त्रासात असलेले पाहून त्यांच्या कल्याणासाठी वडिलांना सूर्य देवाला समजावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सूर्याने सांगितले की, शनी जेव्हा दुसऱ्या घरात म्हणजे मकर राशीत येईल तेव्हा शनीचे घर धन-धान्याने भरपूर असेल. यावर शनी महाराज प्रसन्न झाले व त्यांनी सांगितले की, मकर संक्रांतीला जे कोणी सूर्यदेवाची पूजा करतील त्यांना शनी दशेचे त्रास सहन करावे लागणार नाहीत.
🌺 या राशीमध्ये लग्न म्हणजे घरात महाभारत, तेव्हा लग्नाआधी विचार करा
🌺 या मागील मकर संक्रांतीचे सामाजिक व वैज्ञानिक कारण.
मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण म्हणजे सूर्य उत्तरायण झाल्याने प्रकृती मध्ये बदलांना सुरुवात होते. थंडीने गारठलेल्या लोकांना सूर्यदेवाच्या उत्तरायण होण्याने थंडीपासून बचाव होण्यास मदत होते. भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील सण-उत्सवाचे पर्व हे शेतीवर अवलंबून आहे. मकर संक्रांती अशा काळात येते जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक मका, ऊस, शेंगदाणे, उडीद घरी घेऊन येतात. शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते. म्हणूनच मकर संक्रांतीला खरीप हंगामातील पदार्थांनी या पर्वाचे स्वागत केले जाते.
.
🌺 या दिवसात थंडी असते त्यामुळे सिघन पदार्थाची शरीराला गरज असते.
म्हणून तिळाचे लाडू तीळ गुळ वाटण्याची प्रथा आहे
तीळ आणि गूळ घट्ट लाडवात असतात तशी आपली मैत्री घट्ट असावी अशी भावना त्यामागे आहे. गुळाने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
खरीप हंगामाला आपल्या शरीराला ऊर्जेची गरज असते ती उणीव तिळगुळाचे लाडू भरून काढतात. तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला झाले गेले विसरून जा म्हणजे वैरत्व विसरून मैत्री करू हा उदात्त हेतू आहे !





0 Comments: