तू जर नाही दिसली, ना कधी आली मनी ।
तर उदास होते मन, विसरतो अन्न पाणी ।। १।।
तुझ्या तीन अक्षराच्या नावाने भुरळ घातली।
तुझे नाव घेतल्याविना, कधी नाही मरगळ हटली।।२।।
तू जेव्हा जेव्हा माझ्या यायचीस मनात ।
तेव्हा तेव्हा मी सदा असायचो आनंदात ।।३।।
पण हल्ली, का माझ्यापासून दुरास्त झालीस ।
सांग प्रिय कविता,तू मला नेहमीच हवीस ।।४।।
तुझ्या येण्याने,बहरण्याने मन माझें फुलते ।
तुझी रचना पाहिल्यावरच मन तृप्त होते ।।५।।
तुझ्या शब्दखेळांत नेहमीच मग्न राहतो ग।
कारण तूच माझी कविता जीव की प्राण असतो ग।।६।।
प्रिय कविता कधी नको रुसु, नको ठेऊ रोष ।
तुझ्याविना जीवनात मला कसा राहील संतोष?।।७।।
(कवी हरिसंतोष)
संतोष गोपाळ सावंत 8779172824
रविवार दि.७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १० ते १०.३० पर्यंत वाजताची रचना





0 Comments: